Перейти к содержимому

LIVE : मुंबई च्या आकाशात 2000 ड्रोन्स द्वारे कोरला गेला बाबासाहेबांचा सुवर्ण इतिहास #ambedkar

AWAAZ INDIA TV

0:00 / 0:00

LIVE : मुंबई च्या आकाशात 2000 ड्रोन्स द्वारे कोरला गेला बाबासाहेबांचा सुवर्ण इतिहास #ambedkar

61 224 просмотра · Трансляция закончилась 4 месяца назад
AWAAZ INDIA TV
2,68 млн подписчиков
61 224 просмотра · Трансляция закончилась 4 месяца назад
मुंबई च्या आकाशात 2000 ड्रोन्स द्वारे कोरला गेला बाबासाहेबांचा सुवर्ण इतिहास राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५व्या जयंतीनिमित्त मुंबईने इतिहासाच्या सुवर्णपानावर कोरला जाईल असा एक अद्भुत आणि रोमांचकारी क्षण अनुभवला. दादर येथील शिवाजी पार्क मैदानावर सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या २,००० ड्रोनच्या भव्य शोने संपूर्ण मुंबई भारावून गेली. आकाशात झळकणारे ते प्रकाशचित्र केवळ तंत्रज्ञानाचे प्रदर्शन नव्हते, तर मानवतेच्या महामानवाला वाहिलेली आधुनिक युगातील भव्य आदरांजली होती. सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या संकल्पनेतून तसेच डॉ. हर्षदीप कांबळे, प्रधान सचिव, सामाजिक न्याय विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाने उपस्थित मुंबईकरांना अक्षरशः भारावून टाकले. रविवार दिनांक १० मे, सायंकाळी ७.४५ वाजता सुरू झालेल्या या १४ मिनिटांच्या नेत्रदीपक सोहळ्यात आकाशात बाबासाहेबांच्या जीवनप्रवासातील संघर्ष, वेदना, विद्रोह आणि विजयाची तेजस्वी गाथा उलगडत गेली. शालेय जीवनातील अपमान, महाड सत्याग्रह, चवदार तळ्याचा ऐतिहासिक लढा,अस्पृश्यतेविरोधातील प्रखर संघर्ष, माता रमाई ह्यांचा त्याग, बाबासाहेबानी केलेली भारतीय राज्यघटनेची निर्मिती आणि देशाचे पहिले कायदामंत्री म्हणून केलेले अतुलनीय कार्य — प्रत्येक प्रसंग आकाशात जिवंत होत होता आणि हजारो नागरिक भावनाविवश होऊन टाळ्यांच्या कडकडाटात अभिवादन करत होते आणि सम्पूर्ण शिवाजी पार्क मैदान “जयभीम जयभीम” च्या जयघोषाने दनानून गेले. विशेष म्हणजे, ड्रोन्सद्वारे आकाशात चवदार तळ्याचे सुंदर दृश्य, हातातून वाहणारे पाणी, बाबासाहेब, संविधान, भगवान बुद्ध आणि दीक्षाभूमी यांचे अप्रतिम दर्शन पाहून मन भरून आले. या अभूतपूर्व आणि ऐतिहासिक ड्रोन शो मागे डॉ. हर्षदीप कांबळे यांची दूरदृष्टी, नाविन्यपूर्ण विचारसरणी आणि अथक परिश्रमांमुळे हा कार्यक्रम केवळ एक सरकारी उपक्रम न राहता सामाजिक परिवर्तनाचा आधुनिक संदेश ठरला. त्यानी या संकल्पनेला केवळ प्रशासकीय कार्यक्रम म्हणून न पाहता, बाबासाहेबांच्या विचारांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जनमानसात पोहोचवण्याचा एक सांस्कृतिक आणि वैचारिक उत्सव बनवला. त्यांच्या कार्यातून केवळ एक सक्षम प्रशासकीय अधिकारीच नव्हे, तर बाबासाहेबांच्या विचारांप्रती नितांत आदर बाळगणारा संवेदनशील विचारवंतही दिसून आला. हा ड्रोन शो केवळ प्रकाशांचा खेळ नव्हता… तो समतेचा संदेश होता… तो संविधानिक मूल्यांचा जागर होता… तो मानवतेच्या महामानवाला दिलेला आधुनिक भारताचा भव्य सलाम होता…! केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार, मुंबईतील आमदार आणि इतर अनेक मान्यवर व्यक्ती या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. शिवाजी पार्क मैदानाबाहेरही प्रचंड गर्दी होती. सर्वांनी या नेत्रदीपक सोहळ्याचे भरभरून कौतुक केले. सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट आणि डॉ. हर्षदीप कांबळे यांनी आपल्या कल्पकतेने आणि प्रयत्नांमुळे बाबासाहेबांच्या जयंतीला आधुनिक आणि प्रेरणादायी रूप प्राप्त झाले. या ऐतिहासिक कार्यासाठी झटणाऱ्या सामाजिक न्याय विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समिति आणि ड्रोन्स ऑपरेट करणाऱ्या समस्त टीमचे हार्दिक अभिनंदन! बाबासाहेबांचा सुवर्ण इतिहास मुंबई च्या अवकाशात कोरणाऱ्या सर्वांना मानाचा आणि स्वभिमानाचा जयभीम !