Перейти к содержимому

माऊली मंदीर कणकुंबी | Mauli Mandir Kankumbi | Belgaum | बेळगांव

Sushant Desai

0:00 / 0:00

माऊली मंदीर कणकुंबी | Mauli Mandir Kankumbi | Belgaum | बेळगांव

2 121 просмотр · 1 год назад
Sushant Desai
428 подписчиков
2 121 просмотр · 1 год назад
श्री क्षेत्र कणकुंबी माऊली देवस्थान, खानापूर, जिल्हा बेळगाव-सीमाभाग ---- बेळगाव पासून अंतर 40 किमी खूप दिवसापासून कर्नाटक-गोवा-महाराष्ट्र सीमेवरील प्राचीन ऐतिहासिक कणकुंबी मंदिराविषयी लिहण्याचा बेत होता. किल्ल्यांच्या दुनियेतुन आज वेळ मिळाला. """""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""" सभोवती डोंगर दऱ्यांनी नटलेल्या व निसर्गाचा वरदहस्त लाभलेल्या , सह्याद्रीच्या माथ्यावर सुंदर छोटंसं कणकुंबी गाव वसलं आहे. आणि याच गावात पुरातन प्रसिद्ध असे हेमाडपंथी माऊली मंदिर व मलप्रभा नदीचे उगमस्थान आपला इतिहास जपत अनेक नैसर्गिक व सरकारी संकटांना तोंड देऊन उभे आहे. चला तर मग जाणून घेऊयात कणकुंबी व तेथील स्थळांविषयी. कणकुंबी गाव अनेक वेळा मीडिया मध्ये येते ते तेथील अस्वल-वाघांच्या हल्ल्यांमुळे, निसर्गसौंदर्याने व जैवविविधतेने नटलेल्या सुंदर दऱ्या व त्यामध्ये कोसळणाऱ्या सुंदर धबधब्यांमुळे आणि महत्वाचे म्हणजे तेथे होत असलेल्या कळसा-भांडुरा प्रकल्पामुळे. या गावाला कणकुंबी नाव कधी व कसे पडले? व येथे असणारे माऊली मंदिर(अंबाबाई) इथे कसे स्थापन झाले? येथील कथा व इतिहास 1000 1200 वर्षे मागे घेऊन जातो. या ठिकाणी जंगलात प्राचीन काळी कुळक नावाचे ऋषी व त्यांची पत्नी पर्णकुटीत राहत होते. ते रामेश्वर (शंकर) भक्त होते. येथेच जंगलात त्यांनी गुरुकुल स्थापून शिष्यांना वेद पठन, पूजा अर्चा व बाकीचे देवकार्य शिकवत असत. त्यांच्या आश्रयाला एक मल्ली नावाची अनाथ मुलगी दासी होती, कुळक ऋषींना मुलबाळ नसल्याने त्यांनी तिला मुली सारखेच सांभाळत असत. मल्ली हि त्यांच्या सहवासात शिवभक्त बनली होती. कुळक ऋषी शंकराची आराधना करत असत. एकेदिवशी अरण्यात जाऊन घोर तपश्चर्या करू लागले (रामेश्वर मंदिर जवळ त्याच्या खुणा आहेत). शंकराने प्रसन्न होऊन त्यांना एक शिवलिंग दिले व रोज याची पूजा करण्यास सांगितले. त्यांनी आजचे रामेश्वर मंदिर बांधून त्यात हे शिवलिंग स्थापन केले जे आजही आहे. पण नित्य पूजेसाठी गंगोदकाची आवश्यकता असल्याने त्यांनी पुन्हा शंकराची आराधना केली, शंकर पुन्हा प्रसन्न झाले व ऋषींच्या कमंडलू तुन गंगोदक वाहू लागले. त्यामुळे या ठिकाणास कळकुंबी असे नाव पडले. पुढे त्याचे अपभ्रंश होऊन कणकुंबी असे झाले. कमंडलू मधून गंगोदक वाहू लागले व तेथून नदीचा उगम झाला, आणि ती पुढे वाहत जाऊन कुडलसंगम येथे कृष्णा नदीस मिळते. पण त्याला मलप्रभा नाव कसे पडले? कुळक ऋषीमुनी आपल्या परिवार व शिष्यांसोबत गुण्यागोविंदाने राहू लागले, शिवभक्ती व पूजा अर्चा यातच त्यांचे दिवस जात होते. मल्ली आता मोठी झाली होती, ती सुंदर दिसत होती, ऋषीमुनी व त्यांची पत्नी मल्लीला आपल्या मुली प्रमाणे सांभाळत. जंगलातील असुरांची दृष्टी मल्लीवर पडली, पण मुनींना सिद्धी प्राप्त असल्याने त्यांच्या ब्रह्मतेजापुढे असुरांचे काय चालत नव्हते. मल्ली दररोज घरची कामे व ईश्वर भक्तीत वेळ घालवी, एके दिवशी ती पाणी आणण्यास नदीकडे जात असता असुरांनी तिचा पाठलाग केला. त्यांच्यापासून स्वतःला वाचवण्यासाठी तिने नदीत उडी घेतली. हे घटना शिष्यांकरवी कुळक ऋषींना कळली, ते नदीकाठी आले असता तिथे मल्ली नव्हती असुर होते. त्यांनी असुरांचा वध करण्यासाठी आंबा मातेला आवाहन केले, आंबा मातेने असुरांचा वध केला व ऋषीमुनींच्या विनंतीने कणकुंबी ग्रामी स्थानापन्न झाली. आज हेच माऊली मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे व हे क्षेत्र अनेक लोकांचे श्रध्दास्थान बनले आहे, अनेक लोक लांबून येथे येतात. मल्लीच्या मागील जन्मात तिचे नाव चांदवती होते, आणि तिने केलेल्या सेवेमुळे गौड देशातील सत्यदेवाने तिला वरदान दिले होते की, तू पुढच्या जन्मी एक पवित्र जलदेवता होशील. हे ऋषीमुनींना माहित होते, त्यांनी मल्ली म्हणून हाक मारताच पाण्यातून मल्लीने हात वर केला , त्यामुळे त्यांना समाजले कि मल्ली आता जलदेवता झाली आहे. अन् तो नदीचा प्रवाह मलप्रभा नाव धारण करून आजही आजूबाजूचा परिसर समृद्ध करत वहात आहे. कणकुंबी माऊली मंदिरात दरवर्षी महाशिवरात्री, कालोत्सव, शिमगोत्सव होळी तसेच अनेक दिवशी मोठ्या श्रद्धेने व भक्तिभावाने कार्यक्रम पार पाडले जातात. #belgaum#belgav #jamboti#बेळगांव_प्रेमी